'साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी चंदना सोमाणी यांचा हा सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेला आकर्षक काव्यसंग्रह हाती आला. थोडीशी धावपळ असल्याने मी सदर काव्यसंग्रह एका दमात वाचू शकलो नाही. पण दररोज चार पाच कविता वाचून काव्यसंग्रह संपवला पण मन काही भरले नाही म्हणून आज पुन्हा तो हाती घेतला आणि नव्या उत्साहाने पुन्हा एकदा वाचून स्वानंद घेतला. "चंदनाची फुले" किती सुवासिक आहेत याचा प्रत्यय नवीन नवीन कविता वाचतांना येत होता. कवयित्री चंदनाताई चंदनाची फुले या पहिल्याच कवितेत म्हणतात -
चंदना सोमाणी यांनी या काव्यसंग्रहात कविता आणि गझला यांचा सुरेख मेळ घालून काव्यसंग्रह अधिकच खुलवला आहे.
पुढे त्या शब्दमैफील - यांनी कवितेत म्हणतात -
एक एक कविता वाचतांना वाचक मनातून दाद देत असतो पुढच्या कवितेत त्या म्हणतात
फिर्याद-
माणूस हा सतत रंग बदलत असतो त्यावर त्या चपखल भाष्य करतात -रंग माणसाचे या कवितेत त्या म्हणतात व सुंदर रूपकांचा वापर करून
मनुष्य स्वभाव वेळ प्रसंगी हळवा होतो त्याचा अनुभव प्रत्येकास कधीना कधी येत असतो तसेच
कधी कधी कवयित्री हळव्या होतात आणि त्यांच्या लेखणीतून उतरते ती भावना -
जीवनाकडे त्या अत्यंत तटस्थपणे बघतात व पुढे म्हणतात -
अक्षरांचा लळा, कोरडे क्षण, पुन्हा पावसाळा, चांदणे उतरून आले, लेखणीचा रंग, मनातली सल, नवं पान, आशादीप अशा अनेक दर्जेदार कवितेतून सजलेला हा काव्यसंग्रह नक्कीच वाचकांना आवडेल. शेवटी शोध या कवितेत त्या स्वतःला शोधतात... सगळीकडे सगळीकडे.. पुस्तकाची मांडणी, टाईप आणि कागदाची क्वालिटी उत्तम आहे आटोपशीर पोस्ट घेतो जेणेकरून जाणकार वाचकांना सदर सुंदर काव्यसंग्रहाची थोडक्यात ओळख होईल हाच माफक उद्देश. चंदनाताई सोमाणी असेच आपले साहित्य उत्तरोत्तर सुवासिक होवो आणि आपल्या लेखनाचा परिमल फैलत राहो ही सदिच्छा..मनःपुर्वक शुभेच्छा देतो आणि विराम घेतो.

No comments:
Post a Comment