Followers
Wednesday, 28 February 2024
मराठी गझल - दुःखाची खळगी
Monday, 19 February 2024
मराठी गझल - शिवाजी
मराठी गझल - आरसा आणि क्षणाक्षणाला
सुखदुःखाच्या वळणावर हा ललित लेखसंग्रह, दरवळ रातराणी हा काव्यसंग्रह आणि चंदनाची फुले हा गझल – कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.. शब्दगंध चंदनाचा हे पुस्तकही त्यांच्या नावावर आहे.
सध्या त्या पुणे येथे स्थायिक आहेत. तशा त्या मूळच्या ही पुण्याच्या आहेत. सोमनाथ सोमाणी यांच्याशी त्या १४ जून १९९३ रोजी विवाहबद्ध झाल्या आहेत.
त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशन व सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका समारंभात त्यांना प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत वक्ते आणि संपादक कुमार सप्तर्षी आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते साहित्य गौरव संमेलनात त्यांना विशेष गौरवान्वित करण्यात आले. आहे. अनेक मुशायऱ्यातून त्यांनी गझल पेश केल्या आहेत.
गझलेवर निःस्सीम प्रेम करणाऱ्या चंदनाजींच्या अनेक गझल गायत्री गायकवाड या गायिकेने गायल्या आहेत. डॉ. आश्विन जावडेकर यांनीही त्यांच्या दोन गझलना चाली लावून त्या पेश केल्या आहेत. संकेत नागपूरकर यांनी चंदनाजींच्या अनेक रचना संगीतबद्ध करून मैफलीत तसेच नागपूर आकाशवाणीवरून देखील पेश केल्या आहेत.
अनेक फेसबुक पेजवरून त्यांचे लाइव्ह सादरीकरणही झाले आहे. अनेक मुशायऱ्यांतून त्यांच्या गझलना चांगली दाद मिळते.
चंदनाजी एका गझलेत म्हणतात,
हा जो आयुष्याचा गुंता आहे तो सोडवत बसणे तसे प्रत्येकाला भाग असते. अनेकदा आपणच या गुंत्यात गुंतत राहतो. तरीदेखील सुरेश भटसाहेब म्हणतात तसे, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा....
सगळ्या गुंत्यात गुंतलो तरीदेखील या गुंत्यांतून मोकळे होऊन आपला पाय सोडवून घेतला पाहिजे
आयुष्य म्हणजे तरी काय असतं. एक प्रकारचा गुंताच की... मग नुसता नुसता होतो गुंता म्हणायची पाळी येते. आता आयुष्यात असा गुंता आलाच तर तो सोडविण्यासाठी आपल्यालाच धडपड करावी लागते. तो गुंता सोडवत बसावेच लागते प्रत्येकाला. अनेकदा नात्यांमध्ये देखील गुंता निर्माण होतो. या गुंत्यामुळे नाते कमकुवत होऊ शकते. अनेक जोडप्यांची नाती अशा गुंत्यांमुळे तुटून गेलेली असली तरी चंदनाताई म्हणतात, हा गुंता सोडविणे आवश्यक आणि भागही असते. तरच जीवन सुखी होईल.
त्यांची एक गझल विलक्षण आहे. त्या म्हणतात,
आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब असणारी ही गझल. प्रत्येकाकडे असलेल्या आरशाच्या पाठीमागे पारा असतो. केवळ काचेतून प्रतिबिंब दिसणार नाही. परंतु अनेकदा हा पारा उडून जातो आणि आरसादेखील स्वैर वागू लागतो. पारा उडालेल्या आरशात आपले प्रतिबिंब पाहू नये असे म्हणतात. कारण पारा उडालेल्या आरशात आपणही भग्न भग्न झालेले दिसतो. आपण नसून पारा उडालेल्या आरशातील तो किंवा ती दुसरेच कोणी असावे, असा भास होतो. आपलेपणा आणि परकेपणा हे दोन्ही आपल्या आयुष्याला घट्ट धरून असलेले घटक आहेत. मग या आरशाला एखाद्याचा चेहरा वैरी वाटतो. परंतु जेव्हा द्वेषाची भावना मिटते त्यावेळी मात्र एखाद्या निर्वैर ऋषीसारखा चेहराही निर्वैर होतो. आपण त्या आरशांत एखाद्या शांत वेळी आणि आपले मन स्थिर असताना डोकावून पाहिले असता त्या आरशातून आपण अंतरातील वेदनांची सफर करून येतो. (इथे त्यांनी सैर हा हिंदी- उर्दू शब्द वापरला आहे. त्यामुळे त्या शेराची नजाकत आणखी वाढली आहे.
अंधारावर मात शिवाजी ही गझल शिवचरित्र सांगतानाच जीवनाचे आगळे वेगळे दर्शनही घडवते. खरे तर इतिहास पुरुषांच्या विजयश्रीचे पोवाडे असतात. परंतु गझलेसारख्या नाजूक तरल आणि प्रणयरंगी रंगलेल्या काव्यप्रकारातही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती सांगता येते हे चंदनाताईंनी दाखवून दिले आहे.
त्यांच्या एका गझलेतील शेरातही अध्यात्माची झलक दिसते.
राधा आणि श्याम काही वेगळे नसतात. परंतु राधेश्याम असे म्हटल्यावरच कृष्णाची ओळख पटते. तो राधेशी इतका एकरूप झाला आहे तर मग पावरीत (इथे पावा किंवा बासरीसाठी पावरी हा शब्द त्यांनी वापरला आहे.) पावा हा पुल्लिंगी शब्द तर पावरी (ती पावरी) स्त्रीलिंगी शब्द आहे. या शब्दांतूनदेखील चंदनाताईंनी बासरी आणि कान्हा, राधा आणि कृष्णांचे अद्वैत उलगडून दाखवले आहे.
त्यांची वेडावतो मनाला ही गझल मनाला भुरळ घालणारी आहे. चंदनाताईंनी या गझलांचे फोटो दिल्याने विश्लेषणासाठी प्रत्येक शेर घेतला असला तरी एकत्र पूर्ण गझल देत नाही. त्या फोटोत तो तो शेर वाचणे गरजेचे आहे.
वारा हे चंचलतेचे प्रतीक आहे. शिवाय वायू आहे म्हणून श्वास चालतो. देहामध्ये वारा वाहत असतो. तो कधी चैतन्याच्या सळसळीच्या रुपात तर कधी मनाला चंचलपणा देणारा हा वारा. आपले मनदेखील या वाऱ्याप्रमाणेच अस्थिर व चंचल आहे. क्षणाक्षणाला मनाचा प्रवास सुरू असतो. त्यांनी मनाला वाऱ्याची उपमा दिली आहे.
एका शेरात त्या म्हणतात पावसाचा काही भरवसा नसतो. तो कधी रिमझिम, कधी वादळी आवर्तने घेत, तर काही वेळेला झोडपणाऱ्या गारांच्या रूपाने पडत असतो. प्रेम आणि पावसाची त्या तुलना करतात. पाऊस जसा बेभरवशाचा तसाच प्रियकर (क्वचित प्रेयसीदेखील) चंचल बनून आपल्याला गारांप्रमाणे झोडपून काढते.
हा शेरदेखील महत्त्वाचा आहे. त्या म्हणतात. इथे पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारी रोजी आपण स्वातंत्र्याचे गुणगान गात असतो. परंतु प्रसंगी सत्याग्रह, आंदोलने मोठ्या संख्येने होतात. अनेकदा ती स्वातंत्र्यासाठी मग ती मतं स्वातंत्र्य असो की विचारस्वातंत्र्य असो ते दडपण्यासाठी राजसत्ते तुला मोठ्या प्रमाणात कारागृहे (तुरुंग – कारा) का बांधावी लागतात असा सवाल त्या करतात.
त्यांचे आरशावर प्रचंड प्रेम आहे. अनेक गझलांतून आणि शेरांतून हमखास आरसा प्रकटतो. वेडावतो मनाला या गझलेतही त्याचे प्रत्यंतर येते.
अक्षरांची द्विरुक्ती किंवा शब्दांची द्विरुक्ती त्यांच्या अनेक शेरात वाचावयास मिळते. याच गझलेत राजकारणी (चारा घोटाळा) डोकावतो.
_--------+++
आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या काही गझला व शेरांचे अवलोकन करून त्यांना मी ही भेट दिली आहे. आपण वाचकांनाही ती निश्चित आवडेल. वाचून अभिप्राय द्यालच.
Saturday, 17 February 2024
मराठी गझल - धूसर धूसर नाती
धूसर धूसर रस्ते सगळे धूसर धूसर नाती
ओल्या हिरव्या जखमा आणिक काही भिजल्या राती
दोन क्षणांचे दोन किनारे काय म्हणावे याला
या जन्माची त्या जन्माशी नाळ जोडते माती
कोण कुणास्तव इथे जन्मलो काही कळले नाही
भिजून सुध्दा पुन्हा राहिल्या इथे कोरड्या वाती
पान फुलांचा बहर कोवळा तरी वाकते फांदी
सांभाळुन घे मला सांगतो हात दिलेला हाती
आकाशाशी हितगुज करते क्षितिजावरती धरती
जणू सांगती एकामेका तू माझा सांगाती
चंदना सोमाणी ©®
Thursday, 1 February 2024
चंदनाची फुले - रसग्रहण 13
मनाच्या कोऱ्या पानावर...
जेव्हा पहिल्या जेष्ठ गझलकारा आपल्या गझल_कवितासंग्रह "चंदनाची फुले" यावर लिहितात तेव्हा आभार मानायला शब्द उरतातच कुठे... लेख वाचताना संपूर्ण पुस्तकातील पानं डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागली... आशाताई तुमचा अभिप्राय लेखणीस अजून बळ देईल हे निश्चित....🙏🙏
कितनी बातें...
कितनी बातें... हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...
-
गझल - सांजवेळी ही उदासी काजळी पेरीत येते सांजवेळी ही उदासी का मला शोधीत येते सांजवेळी ही उदासी याद येते त्या क्षणांची ज्या क्षणांवर प्रेम...
-
मराठी गझल - प्रश्न हजारो घुटमळलेले प्रश्न हजारो अन् दबलेले प्रश्न हजारो याला सुद्धा, त्याला सुद्धा सतावलेले प्रश्न हजारो नवीन कोडी सोडवत...
-
गझल - कोणती विराणी अंधार या मनाचा की कोणती विराणी मी आळवीत आहे गाणी उदासवाणी वाटे मनास माझ्या येथून दूर जावे आभाळ मागते हे फिरुनी पुन्हा न...






