Followers
Tuesday, 24 December 2024
24 डिसेंबर=
Wednesday, 9 October 2024
चंदनाची फुले रसग्रहण - 17
Wednesday, 2 October 2024
चंदोळी - १०
चंदोळी - ९
Friday, 27 September 2024
मराठी गझल - जणू
सुखाने वाफसा धरला जणू...
चला सुरुवात झाली चांगली
मला मिसरा उला सुचला जणू...
जसा हातात आला आरसा
भ्रमाचा भोपळा फुटला जणू...
खरे बोलायचे होते जिथे
तिथे खोटेपणा डसला जणू...
जरा पाणावले डोळे तिचे
मखर अश्रूंमधे सजला जणू...
खरा उरला कुठे हा कायदा
इथेही न्याय तर हरला जणू...
तसा तर भास की आभास हा
अहम् माझ्यातला गळला जणू...
चंदना सोमाणी ©®
Saturday, 21 September 2024
तानापिहिनिपाजा...
Monday, 16 September 2024
चार ओळी - २०
Sunday, 15 September 2024
मराठी गझल - एकेक पाकळी
बांधून घेतली लेणी सुबक जरी
कोरीव दुःखही हसणार शेवटी
किंतू मनातला काढून टाकला
पण वाद हा जुना उरणार शेवटी
वेचू नकोस तू कण कण मनातले
अंदाजही तुझे चुकणार शेवटी
हा चेहरा नको अन् आरसा नको
प्रतिमाच आपली फसणार शेवटी
हेतू न चांगला तू हे म्हणू नको
तो मर्म त्यातला कळणार शेवटी
हा देह जाळला मी चंदनापरी
राखेतही फुले फुलणार शेवटी
चंदना सोमाणी ©®
Tuesday, 3 September 2024
मराठी गझल - हो ना..?
Monday, 2 September 2024
Sunday, 1 September 2024
मराठी गझल - दिवा
अन् स्वतःच्या भोवती अंधारतो आहे दिवा
पेटला होता निखारा काजळीच्या आतही
शेवटी विझला तरीही धुमसतो आहे दिवा
घात केला आपल्यांनी आणि आली संकटे
पांगळ्या पायांसवे तेजाळतो आहे दिवा
लुप्त झालेल्या दिशांची एक काळी रेघ तू
हे असे म्हणता क्षणी आभाळतो आहे दिवा
धूळ चढलेल्या क्षणांचा मागतो आहे ठसा
ह्या कुण्या गावात आता हरवतो आहे दिवा
वादळे आली किती अन् वादळे गेली किती
पण युगांचा वारसा सांभाळतो आहे दिवा
Saturday, 31 August 2024
Saturday, 24 August 2024
मराठी गझल - शेवटी गर्दीच ही
Thursday, 22 August 2024
Monday, 19 August 2024
Saturday, 17 August 2024
Saturday, 10 August 2024
Thursday, 8 August 2024
चंदोळी - ६
Friday, 2 August 2024
Thursday, 1 August 2024
मराठी गझल - सांजवेळी ही उदासी
Wednesday, 31 July 2024
मराठी गझल - उगा छळते
मराठी गझल - पुन्हा पावसाळा
Monday, 29 July 2024
मराठी गझल - वाटतात त्या जरी
Wednesday, 24 July 2024
चंदोळी - ४
Sunday, 21 July 2024
मराठी गझल आणि रसग्रहण - या मनाचे त्या मनाला
*रसग्रहण*
*सौ. सविता सामंत*
*गोवा*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
चला तर आपण आजच्या रसग्रहणाकडे वळूया!!
आदरणीय गझलकारा सौ.चंदनाताई सोमाणी यांची व्योमगंगा वृत्तातली एक दमदार गझल आणि तिचे रसगग्रहण यांचा आस्वाद घेऊया!
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*मतला* -0️⃣1️⃣
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*मन चिंती ते वैरी न चिंती*
या उक्तीनुसार मानवी मन हे अनाकलनीय आणि गूढ आहे. कधी कधी दोन व्यक्ती खूप जवळचे मित्र असतात.पण काही तात्विक वादांमुळे कटुता निर्माण होते. आता यात दोघांना किंवा कुणा एकट्याला जरी वाटले की आत्ता मला त्याच्याशी बोलायचं आहे.पण मग मनात विचार येतो की वादामुळे आधीच मनात कटुता आहे. मी परत बोलल्याने जर ती कटुता आणखीनच वाढली तर!....असा विचार करून त्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट आपल्या प्रिय व्यक्तीला सांगताही येत नाही.
एकमेकांना एकमेकांची सवय झालेली असते. दोन मित्र असो मैत्रिणी असोत वा प्रियकर-प्रेयसी...! छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांशी बोलण्याची सवय असते. एखादी नविन गोष्ट आवडली.नविन गोष्ट पाहिली तर ती कधी एकदा त्याला किंवा तिला सांगेन अशी मनाची अवस्था होते. आणि मग अशा स्थितीत ती गोष्ट मनात कोंडून ठेवावी लागते.मग मनाची तगमग, मनाची अस्वस्थता वाढते. या मनाच्या अवस्थेत *धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं* ही उक्ती लागू होते. अश्या मनाच्या अवस्थेचं नेमकं वर्णन गझलकारांनी केलं आहे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*शेर* -0️⃣2️⃣
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*शेर* -0️⃣3️⃣
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*काल मी माझ्या सर्व मैत्रिणींना भेटले खूप धमाल केली*
*शेर* -0️⃣4️⃣
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे*
या उक्तीप्रमाणे एका वाक्यात प्रस्तुत शेराचा आशय आहे. स्त्रीला तिच्या जीवनात अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात.त्यात महत्वाच्या दोन भूमिका म्हणजे पत्नी किंवा प्रेयसी आणि दुसरी आई! आपल्या सहचराबरोबर पत्नीचं नातं ती सुरूवातीला जेवढे समरसून निभावते तेवढं ती आई झाल्यावर निभावू शकत नाही.माया, जिव्हाळा हा स्त्रीचा स्थायीभाव आहे.आई-बाळाचं नातं जगातील सर्वात नि:स्वार्थी नातं आहे. ज्याला नऊ महिने उदरात मायेने वाढवलं आहे, तो बाळ हा आईचाच एक भाग आहे.इतके दिवस बाळाशी तिचा मूक संवाद होता. ती आई झाल्यावर तिचं जास्तीत जास्त लक्ष,तिचा ओढा आणि तिचं ममत्व हे साहजिकच बाळाकडे आहे.
या शेरात गझलकारांनी याची प्रांजळपणे कबुली दिली आहे, की मी एक बाई असले तरी, आईची भूमिका मला नात्याच्या बाबतीत अधिक श्रीमंत करते. ही भूमिका आता मी अधिक तन्मयतेने निभावते आहे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*शेर* -0️⃣5️⃣
आनंदाचे,सुखाचे जे प्रसंग आपल्या जीवनात येतात, कालांतराने त्या रम्य आठवणी बनून मनात घर करतात. कधी निवांत वेळी सारे प्रसंग डोळ्यासमोर तरळतात.किंबहुना त्या गोड आठवणींना उजाळा देणं ही मानवी मनासाठी त्या प्रसंगाइतकंच आनंददायी असतं. त्या सुखाच्या प्रसंगातील नेमका कोणता क्षण मला सुखी करुन गेला...!आधीचा क्षण चांगला होता की नंतरचा चांगला होता याचा शोध घेण्याचा मनाला छंदच जडतो. पण नेमका कोणता क्षण चांगला वाटला हे सापडत नाही.
आनंदात आणि सुखातही माणसाची तुलना करण्याची सवय काही संपत नाही. मानवी मन सुखाचा पुर्नप्रत्यय आठवणीतून घेत असतं....पण त्यातही अधिक सुखाचा शोध चालू असतो!!
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*शेर* -0️⃣6️⃣
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
सण किंवा उत्सव पर्व हे आपल्यासाठी आनंदाने क्षण घेऊन येतात. पण आनंद आणि सुख घेऊन येणाऱ्या क्षणांनाही आपण उत्सव पर्व का म्हणू नये? आनंद ओसरल्यावर आनंदी क्षण निघून गेले तरी मन मात्र त्या क्षणांभोवती रेंगाळत असतं.
पण हे झालं सामान्य माणसांविषयी. विशिष्ट ध्येयाने प्रेरीत माणसे त्या क्षणांमध्ये काही क्षण रमतात. पुन्हा आपल्या ध्येयपथावर चालायला सुरुवात करतात.
काळाची पावले ओळखून काळाच्या किनाऱ्यावर आपलं नाव कोरणारी माणसं, कितीही आनंदाचे क्षण असले तरी भुलून जात नाही. त्यांचे प्रयत्न सतत आपल्या ध्येयाच्या दिशेने सुरूच असतात. जगाच्या कल्याणासाठी आगळं वेगळं काम करत असतात. लोकहिताचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नाही. सैनिक, शास्त्रज्ञ, नर्स, डाॅक्टर, समाजसेवक अंतराळवीर.....ही काही उदाहरणे आहेत.अशा अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असतात.....अविरतपणे.....न थांबता!!
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*शेर* - 0️⃣7️⃣
〰️〰️〰️〰️〰️〰️
तुला कधीतरी कळेल का...तुझ्या बोलण्याने माझ्या मनावर किती घाव करत असतोस. मी तुझ्याकडून नेहमीच प्रेमाची आणि सरळ बोलण्याची साधी अपेक्षा करत आले. पण तुला मात्र माझी एवढी माफक अपेक्षा पूर्ण करता आली नाही.
तू सदोदीत उपेक्षा करत आलास. तुझ्या निष्काळजी वागण्या बोलण्याने मनावर रोज नविन घाव करत आलास. आता या मनावर जखमांचे अनेक चरे पडले आहेत.हे काही आजचं नाही.हे तुझं रोजचंच आहे. आता मनाला वेदनेची आणि जखमांची इतकी सवय झाली आहेकी त्यांची मोजदाद करणेही मला कठीण झाले आहे.
सहजीवनात पती -पत्नी दोघांनी एकमेकांचा आदर करावा.एकमेकांना वेळ द्यावा.भावना जाणून घ्यावा.मतांचा आदर करावा.या सर्वांच्याच अपेक्षा असतात.
आजची स्त्री घरदार,नोकरी-धंदा, मुलांचं संगोपन, कुटुंबातील सर्वांची
काळजी या सर्व आघाड्या व्यवस्थित सांभाळते, तेव्हा पुरुषाने... पतीने तिला या सर्व गोष्टीत सहाय्य करायलाच हवे.
हे करताना तिचे मनही जपायला हवे.ती आपलं घर सोडून आली आहे आणि या घराला ती आपलं समजून सतत कार्यशील राहाते आहे, याची जाणीव घरातील प्रत्येकाला असायला हवी, पण पतीला ही जाणीव अधिक दृढतेने असायला हवी.तरच दोघांतील विश्वासाचं नातं अधिक घट्ट आणि समृद्ध होईल....खरं ना!!
या गझलेतील मला उलगडलेला आशय मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.या गझलेतील आशयसौंदर्य हे पूर्णपणे गझलकारांचे आहे.
धन्यवाद!🙏🏻
दि. 26/01/20
Friday, 19 July 2024
चार ओळी - १२
मराठी गझल - त्याला
Thursday, 18 July 2024
मराठी गझल - प्रश्न हजारो
चार ओळी - १०
Tuesday, 16 July 2024
पन्नो पर...
मानों के फूल खिलते हैं पन्नो पर
कई क़िस्से बनते हैं बिगड़ते हैं
कई क़िस्से संवरते हैं पन्नों पर
ये कैसी नाराज़गी है फूलों से, के
दास्तां कांटों से लिखते हैं पन्नों पर
उजाड़ दिये हैं जिनके घर रातों ने
ख़्वाब उनके भी सजते हैं पन्नों पर
कुछ अलग है उनका अंदाज़-ए-बयां
वो एहसास छोड़ते हैं पन्नों पर
चंदना सोमाणी ©®
Sunday, 14 July 2024
मराठी गझल - किती कोंडमारा
चार ओळी - ८
Thursday, 11 July 2024
Sunday, 7 July 2024
Saturday, 6 July 2024
चंदोळी - ३
Wednesday, 26 June 2024
मराठी गझल - जाणता अजाणता
Thursday, 20 June 2024
मराठी गझल - तरी जन्म हासला
Thursday, 13 June 2024
मराठी गझल - जिंदगी
Tuesday, 11 June 2024
मी पाठवलेले पत्र...
Sunday, 9 June 2024
मराठी गझल - जर तुझा तर...
Wednesday, 29 May 2024
Sunday, 26 May 2024
माझे दोन शब्द - मी आस्तिक मी नास्तिक
देव आहे की नाही..? भुत-प्रेत आहे की नाही..? स्वर्ग नर्क हे अस्तित्वात आहेत की या कल्पना..? हे, ते, असे अनेक प्रश्न..???????????????
बापरे मनाला किती प्रश्न पडतात नाही...?
मला नाहीत तर जवळपास सर्वांनाच ही प्रश्न पडतात ज्याची उत्तरे अधांतरीच......
यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण कधी केला का ? किंवा करतो का..?
पण समजा आपल्या हाती असाच प्रश्न उत्तरांचा उहापोह असलेला वैचारिक ग्रंथ हाती आला तर आवडेलच ना वाचायला...?
हो नक्कीच! कुणाला नको आहे शंकांचे निरसन...!
अशाच सर्व मनातील प्रश्नांचा उहापोह करणारे दुकान म्हणजेच लेखक पुष्कराज गावंडे दादांचा वैचारिक ग्रंथ " मी आस्तिक मी नास्तिक "....
सहज, सोपी, ओघवती भाषा शैली तसेच मधेच येणारी सुंदर वर्हाडी भाषा मनाचा ताबा घेत गेली आणि पुस्तकाचा फडशा एका दमात पाडला...
देव आहे तर तो कसा आहे..?
कुठे आहे..?
तो आपल्याला दिसत का नाही...?
अशीच प्रश्ने मलाही नेहमीच पडत, मला पुस्तक वाचायच्या आधी वाटायचे की जगात आपण एक वेडे आहोत की काय पण इथे तर हे सारेच प्रश्न लेखकालाही पडलेले दिसतात. देवाचे अस्तित्व नाकारावे की स्वीकारावे लेखकासोबतच प्रत्येकाला पडलेला प्रश्न...?
देवाला मानावे तर आस्तिक नाही मानावे तर नास्तिक असा हा सामाजिक दृष्टिकोनाचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो यातून लेखकही सुटलेला नाही याचा प्रत्यय आपल्याला वाचताना येतो...
जेव्हा लेखकाचे मित्र लेखकाला नास्तिक, " बेअक्कल हाय लेकाचा" असे हिणवतात...
देवाचे अस्तित्व आपण स्वीकारावे की नाही ह्या स्वतःला उद्भवलेल्या प्रश्नामुळे " मी आस्तिक मी नास्तिक" हे या वैचारिक ग्रंथाचे नाव अगदी समर्पक ठरते...तसेच त्या नावाला साजेसे मुखपृष्ठ व मलपृष्ठावर असणारी दादाची सदरील ग्रंथाला साजेशी छबी...सर्वच उत्तम...!
या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लेखकाने गौतम बुद्धांच्या पासून ते आज पर्यंतच्या भोंदू साधू बाबांपर्यंत बराच वैचारिक उहापोह केलेला दिसून आला...!
हा जरी वैचारिक ग्रंथ असला तरी वाचतांना लेखकाची मिश्किल शैली गंभीरपणा जाणवून देत नाही त्यामुळेच वाचतांना हसे आवरत नाही. प्रकरण 30 आणि 35 प्रकरण वाचतांना हास्याची तर खसखसच पिकते...
इथे लेखकाने अनेक पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरे मागताना सर्व देवा- धर्माप्रती संत महात्म्यांचा आदर करून त्यांच्या प्रश्नांमुळे जर कोणाची मने दुखावली गेली असतील तर मोठ्या मनाने माफी देखील मागितली आहे. यात जे प्रश्न लेखकाचे आहेत तेच प्रश्न तुमचे, माझे, सर्वांचेच आहेत. हे प्रश्न कोणी विचारतात तर कोणी मनातच पडताळून पाहतात कारण देवाधर्माविषयी अशा प्रश्नांची कुठे वाच्यता केली तर समाज काय म्हणेल..? हा प्रश्न समोर उभा राहतो...
लेखनातून शेतकऱ्यांविषयीचा कळवळा सुंदररित्या मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत आणि भ्रष्टाचारावरही कोरडे ओढण्यात लेखकाने काहीच कसर ठेवली नाही...
जातीभेद पाळणे चांगले की वाईट यावर लेखक म्हणतो, की माझ्यामते जाती पाळाव्यात पण फक्त उच्चनीच भेदभाव पाळू नये तो वाईट! जाती वा 'आपला समाज' ही गोष्ट तुमच्यासाठी एक संरक्षण आहे. एक कवच आहे. ती तुमची कुंडले आहेत. ती गळून पडली तर तर तुम्ही तगू शकणार नाही. तुमचा कर्ण होईल....
एकंदरीत लेखकाने सदर ग्रंथात सर्व विषयांचा कट्टा-चिट्टा स्पष्ट व समर्पक शब्दात पेलला आहे...
माणूस कितीही नास्तिक असण्याचा आव आणत असला तरी त्याच्या मनात एक कोपरा हा श्रध्देचा असतोच, पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी-परंपराचा पगडा हा मानवी जीवनावर कितीही नाही म्हटले तरी असतोच...एकप्रकारची अनामिक भिती ही त्याठिकाणी असतेच म्हणून जो देवाला मानत नसल्याचे आव आणतो तो देखील देवाला भितो...तसे पाहिले तर देव अस्तित्वात आहे नाही हा विषय लांबच परंतू एक अज्ञात शक्ती असते जिला आपण श्रद्धा असे म्हणतो...
सदरील ग्रंथात मी कुठेही माझं ज्ञान पाजळलेलं नाही, तर मी, माझं अज्ञान प्रकट केलेलं आहे! कुठलाही अहंभाव नसलेलं मलपृष्ठावरील हे वाक्य लेखकाच्या मनाच्या महानतेची खोली सांगून जातं
स्वतः लिहून झाले रिकामे पण आमच्या विचारांचे मात्र चक्र सुरू करून....
शेवटी प्रश्न हे प्रश्नच राहतात...
तसे पाहिले तर एखाद्या पुस्तकाविषयी ही माझी पहिलीच समीक्षा ते घरचा आहेर म्हणजे माझा दादा त्यामुळेच मी समीक्षा करावयास धजले....
तरीही जर चुकून काही अधिक उणे असल्यास माफी असावी
चुक भुल देणे घेणे....
चंदना सोमाणी ©®
चार ओळी - ४
मराठी गझल - डोळ्यात आसवांचा
Saturday, 25 May 2024
मराठी गझल - पहाटवारा
कितनी बातें...
कितनी बातें... हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...
-
गझल - सांजवेळी ही उदासी काजळी पेरीत येते सांजवेळी ही उदासी का मला शोधीत येते सांजवेळी ही उदासी याद येते त्या क्षणांची ज्या क्षणांवर प्रेम...
-
मराठी गझल - प्रश्न हजारो घुटमळलेले प्रश्न हजारो अन् दबलेले प्रश्न हजारो याला सुद्धा, त्याला सुद्धा सतावलेले प्रश्न हजारो नवीन कोडी सोडवत...
-
गझल - कोणती विराणी अंधार या मनाचा की कोणती विराणी मी आळवीत आहे गाणी उदासवाणी वाटे मनास माझ्या येथून दूर जावे आभाळ मागते हे फिरुनी पुन्हा न...

















































