अलवार उलगडत जाणारा सुंदर कविता संग्रह...
रसग्रहण - निलेश कवडे
'चंदनाची फुले' हा कवयित्री चंदना सोमाणी यांचा कवितासंग्रह पृथ्वीराज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केला आहे. कविता संग्रहामध्ये गझल, मुक्तछंद, लावणी आणि गीत अशा वैविध्यपूर्ण कविता आहेत. कवितासंग्रहातील सुरूवातीच्या काही कविता गझल आहेत. एकूण कवितांपैकी गझल जास्त आहेत.
चंदना सोमाणी यांना गझलेची खरी वाट सापडली आहे म्हणूनच त्यांच्या एका गझलेत त्या म्हणतात,
अशा शेराने त्या रसिकांच्या काळजाला साद घालतात. त्यांची गझल भावनांची सुंदर अभिव्यक्ती आहे. ही अशी सुंदर अभिव्यक्ती का झाली याचे उत्तर त्यांच्या गझलेतच रसिकांना मिळते,
त्यांचे जीवन गझलमय झाल्याचा प्रत्यय हा शेर देतो. चुकीच्या वा पर्यायाने आलेल्या शब्दाने शेराला उंची मिळत नाही तर गझल मध्ये चपखल शब्द योजना असली की शेर उंचीवर जातो. त्यांचा पुढील शेर बघा,
अक्षरांचा लळा असल्याशिवाय अर्थ आकाश व्यापत नाही… अक्षरांचा लळा असल्यामुळे त्यांची गझल सहज आहे. समजायला सोपी आहे. ती अलवार भाव घेऊन येते.
म्हणूनच हा शेर किंवा
प्रेम हा भाव गझलेत तरलपणे मांडतानाच चंदना सोमाणी वास्तविकता सुद्धा प्रभावी शब्दात मांडतात...
असे शेर रसिकांना आयुष्याच्या खऱ्या दार्शनिक स्वरूपाची अनुभुती देतात. आयुष्य सुखदुःखाच्या वाटेने पुढे सरकत असते. माणसाला जगताना बरेवाईट अनुभव येतात ते खूप काही शिकवून जातात. परिस्थितीची दाहकता व्यक्तीला जीवनाशी समायोजन करायला भाग पाडते. अशा बिकट परिस्थितीत व्यक्ती तत्वांशी तडजोड न करता खंबीरपणे आयुष्याच्या लढाईला सामोरे जातो. ही लढाऊ वृत्ती चंदना सोमाणी यांची गझल जपते,
त्यांचे असे शेर परिस्थितीची झळ सोसणाऱ्या माणसाचे प्रतीक बनते. सामाजिक बदल सुद्धा चंदना सोमाणी यांची गझल प्रभावीपणे टिपते,
त्यांचे असे शेर समाज जीवनात झालेल्या विलासी जीवनशैलीला अधोरेखित करतात… त्यांच्या मनाची अस्वस्थता त्यांची लेखणी प्रभावीपणे विशद करते.
अशा शेरातून त्यांची गझल 'खुल्या जाणिवांचा कोंडमारा' मांडते. गझल प्रमाणेच त्यांनी कवितेचे इतर प्रकार सशक्तपणे हाताळले आहेत…
'मी पाठवलेले पत्र' या मुक्त छंदातील कवितेमध्ये त्या म्हणतात, "अरे देवा हे काय केले मी तुला लिहायला घेतले पत्र पण कोरेच पाठवून दिले" देवाला हे पत्र पाठवल्यावर त्या विनंती सुद्धा करतात "घे ना समजून माझ्या मनातील मौन" असा संवाद त्या साधतात…त्यांची 'थंडीची भीती' ही कविता थंडीच्या दिवसातील जीवनमान चित्रित करते. भवसागरी या कवितेमधून "त्या दूरदृष्टी असेल ज्याची तोच पार या भवसागरी" हे जीवन विषयक तत्वज्ञान मांडून जातात. त्यांच्या मुक्तछंदातील कविता संवादी आहेत… त्या वाचकांशी हितगुज करतात या कविता वाचताना रसिक या कवितांशी एकरूप होऊन जातात. 'मैत्री' या कवितेमधून त्या खऱ्या मैत्रीचा महिमा सांगतात. कवयित्रीला सामाजिक प्रश्नांची जाण आहे. अन्यायाविषयी चीड आहे. म्हणूनच समाजात घडत असलेल्या विघातक गोष्टींवर प्रहार करायला त्यांची लेखणी घाबरत नाही .'स्त्री तुझी अजब कहाणी' या कवितेमधून ते आपल्या व्यवस्थेवर प्रहार करतात महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर ही कविता मार्मिकपणे भाष्य करते. 'प्रश्नचिन्ह' हे शीर्षक असणारी त्यांची कविता पुरुषी मानसिकतेला प्रश्न विचारून निरुत्तरित करून टाकते.
'वेगळे रंग' या कवितेमध्ये ऐहिक सुखा पलीकडचे खरे प्रेम त्या मांडतांना म्हणतात, "चल एक नवीन आकाश शोधूया तुझ्या न माझ्या वेगळ्या अशा इंद्रधनुषी रंगासाठी" अशा शब्दांत त्यांनी प्रेम या भावनेला अधिक व्यापक बनवले आहे.
बाईला पुरुषाकडून किंबहुना तिच्या जोडीदाराकडून भावनिक आधाराची जास्त गरज असते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हाच भाव 'मनातल्या कविता' या कवितेमधून त्या अधोरेखित करतात. त्यांच्या पुढील ओळी बघा,
अशा शब्दात कवयित्री चंदना सोमाणी असंख्य स्त्रियांच्या अव्यक्त भावना त्या बोलक्या करतात… 'क्षण' या कवितेत त्या एखाद्या कळी प्रमाणे हळुवार उलगडत जातात...
अशा शब्दात स्त्री सुलभ भाव हळुवारपणे सुरेख मांडतात… 'भिजलेले क्षण' या कवितेमधून त्या थेट पावसाला साद घालतात. लावणी हा प्रकार सुद्धा त्यांनी सुंदर हाताळला आहे.
'नवं पान' या कवितेत त्या जीवनविषयक आशावाद मांडतांना त्या व्यक्तीच्या थेट वर्मावर बोट ठेवतात…
किती सुंदर शब्दांत त्यांनी दुःखाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात ओढाताण वाढली की तणाव वाढतो. म्हणूनच ओढ कायम ठेवण्यासाठी व्यक्तीने सतत प्रयत्न करत राहायला हवे. एकमेकां मधला जिव्हाळा आपण जपला पाहिजे. नात्यांमध्ये ओलावा कायम राहिला तर ओढाताण होत नाही. आजच्या या काळात हा ओलावाच जगण्याचा खरा आधार आहे.
'चंदनाची फुले' या कविता संग्रहाला सुप्रसिद्ध जेष्ठ गझलकार आदरणीय म. भा. चव्हाण सर यांची पाठराखण लाभली आहे. कविता संग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक आहे. मुखपृष्ठावर कवितासंग्रहाचे नाव सुंदर पद्धतीने लिहिले गेले आहे. त्यामुळे मुखपृष्ठ आकर्षक झाले आहे. कवितासंग्रहातील तांत्रिक बाबी चांगल्या हाताळल्या गेल्या आहेत. चंदना सोमाणी यांची कविता लिहिण्याची स्वतःची शैली आहे. त्यांच्या कविता सहज आणि अलवार असतात. त्या उस्फुर्त भावना मांडतात. त्यांच्या कवितांमध्ये लय आहे. रसिक वाचता वाचता त्या गुणगुणायला लागतात ही त्यांच्या लिखाणाची खरी ताकद आहे. चक्रव्यूह, पोकळी, चौफुली आणि ओंजळीतली भाव फुले या कविता वाचकांना वेगळीच अनुभूती देतात. इतरही कविता आपल्या वेगळेपण जपतात.
'आस' या कवितेमध्ये चंदना सोमाणी यांनी मांडलेला विचार माणसाला चिंतन करायला लावतो. खरे जगणे म्हणजे काय याचे उत्तरच ही कविता वाटते. त्या या कवितेमधून एक आस व्यक्त करतात ती मला खूप महत्त्वाची वाटते,
अशा शब्दात त्या माणसाला जगायला प्रवृत्त करतात. 'चंदनाची फुले' हा कवयित्री चंदना सोमाणी यांनी रसिकांना एक सुंदर कविता संग्रह दिल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन… त्यांच्या पुढील लिखाणास माझ्या मनापासून शुभेच्छा…
………निलेश कवडे अकोला
मो. ९८२२३६७७०६
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:
Post a Comment