शेवटी काहीच नाही बोलता आले मला
हात हाती घेतला अन् स्पर्श बोलू लागला
रात्र नव्हती, चंद्र नव्हता आणि नव्हत्या तारका
त्याच ओढीने पुन्हा मग रातवाही बरसला
एक इच्छा का पुन्हा निसटून जाते सारखी
एक फुंकर घातली अन् एक तारा निखळला
जायचे आहे तसेही त्याच वाटेने पुढे
वाट नाही ओळखीची आणि चालू लागला
दूर होता चंद्र तेव्हा जवळ होता काजवा
हे असे ठरवू कसे मी कोण आहे आपला
वाह वाही होत गेली.. शब्द होता वेदना
हा कुणाच्या मिळकतीवर शेर लिहिला चांगला
चंदना सोमाणी ©®

खूप सुंदर बेटा!
ReplyDelete